गांधींच्या हत्येसंबंधीच्या खटल्यातून सावरकर निर्दोष, निष्कलंक सुटले. त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या पर्वातील ती जणू अग्निपरीक्षाच. सोन निकषाला उतरलं आणि अधिकच तेजानं झळकू लागलं.
सोने निकषाते उतरले, अधिकचि तेजे ते झळकले!ध्रु.
स्वतंत्र देशी नाहि वंदना
परि टळली ही मानखंडना
अग्निदिव्य हे फार अलौकिक, कुणि न जगि हे साहिले!१
भांडण असते जगि तत्त्वांचे
कधीहि नसते व्यक्ति व्यक्तिंचे
असंख्य अनुयायांनी मोदे, वीरा अभिवादिले!२
पतिव्रता त्या जानकीसही
अग्निपरीक्षा चुकली नाही
इथे विसरलो झाले गेले, भाव न कटु उरले!३
क्षमाशील हा उदार आत्मा
कृती ठरविते त्यास महात्मा
महामनाच्या चरणांवरती, पडुन धन्य होतील फुले!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment