१९५६ साली पुण्यातील रमणबागेत भाषण करताना, धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे तत्त्व सावरकरांनी मांडले, राष्ट्राला धर्म अत्यावश्यक असल्याची जाणीव दिली. हिंदुधर्माला त्यांनी इशारा दिला -
हिंदुधर्मा रे खुळ्या, सहनशक्ती विसर रे
आण चित्ती क्रोध रे!ध्रु.
अन्याय कैसा साहशी?
सुस्त कैसा झोपशी?
धर्म बदले -राष्ट्र बदले,
तत्त्व इतुके जाण रे!१
रात्र वैऱ्याची दिसे
सामर्थ्य तव कोठे असे?
बिंदु बिंदू मिळुनि सिंधू, हिंदुराष्ट्रा उभव रे!२
क्रोध म्हणजे जागृती
शांतवृत्ती सोड ती
मुर्दाडपण टाकून दे - प्रतिकारवृत्ती फुलव रे!३
धर्म जगता राष्ट्र राहे
धर्म तर इतिहास आहे
धर्माविना पृथ्वीवरी राष्ट्र क्षण ही नच उरे!४
शरिरि जैसा प्राणवायू
तुजमुळे वाढेल आयू
सामर्थ्य अन् संजीवनी तू, दिव्यता तव जाण रे!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment