मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर विलायतेला निघाले होते. 'शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. जणू शिवरायांचा आशीर्वादच त्यांना मिळाला. शत्रूच्या शिबिरात निघालेल्या वीराला जणू तो वरदहस्तच होता.
९ जून १९०६. पर्शिया बोटीनं मुंबईचा समुद्रकिनारा सोडला. मातृभूमीच्या निरोपाच्या क्षणी त्या भक्ताचे मन भारावलं.. हेलावलं. दूर दूर जाणाऱ्या किनाऱ्याकडे पहात हात जोडले गेले नि ओठी शब्द उमटले.
मातृभूमि, नेत्र भरुनि तुजसि पाहु दे ..
मातृभूमि, नेत्र भरुनि तुजसि पाहु दे !
विरह सोसण्यास, चित्त वज्र होऊ दे!ध्रु.
तुजला करण्या स्वतंत्र,
शस्त्रयुद्ध हेच तंत्र
शत्रूच्या शिबिरि मला - स्वयेच जाऊ दे!१
द्रव्य ते हवे कशास?
लोभ क्षुद्र नच मनास
त्वत्कारणि देह पडो हेच भाग्य दे!२
निर्मू अभिनव भारत,
ध्येयवेड हे सांप्रत
कर्तव्यपालना कठोर आत्मशक्ति दे!३
कर जुळले, शिर झुकले
उधळत मी शब्दफुले
शब्दांना खड्गाची धार येऊ दे!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment