त्या महाकाव्याचा आता अखेरचा सर्ग चालू होता. त्या महान ग्रंथाची पानं झपाझप उलटत होती... माई आजारी होत्या. कसलीशी चाहूल लागली... दाराजवळ पावलं वाजली... काळाची पावलं होती ती.
माई गेल्या... नंदादीप विझला.. तिचं सोनं झालं ।
वाजली काळाची पाउले
सोने माईचे झाले!ध्रु.
स्वतंत्र भारत तिजला दिसला
कधी नव्हे तो प्रपंच केला
अहेवपणिचे मरण सुदैवे, साध्वीते लाभले!१
जन्मभरीची सोबत केली
सुख-दुःखांशी समरस झाली
कुणीतरी पथि पुढती जाणे कधीच की ठरले!२
चंदनवाडी ते चंदन न्या
अनंतास पोचवा सुकन्या
श्रम कुठलेही मुळि न सोसवत, शरिर मम शिणले!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment