Saturday, March 21, 2009

मन्दिर खुलता.

रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत त्यांनी मोलाचं समाजकार्य केलं. पतित पावन मंदिराची उभारणी केल्याने परमेश्वराची पतित पावन ही पदवीच सार्थ झाली हे मंदिर अस्पृश्यांना खुलं झालं आणि त्या निमित्तानं एक स्वप्न साकार झालं. युगायुगाचं सुतक फिटलं... सारं कसं पवित्र मंगल झालं.

पतित पावन मंदिर खुलता, मंगल मंगल झाले!ध्रु.

वंदू सगळे आज गणेशा
करि समर्थ तू हिंदू देशा
मनोमनी भक्तांनी जमुनी, विघ्नेशा विनविले!१

सहभोजन सोहळा शोभला
प्रेमरसाने पुरता भिजला
विभिन्न छोट्या जाती विरल्या, राष्ट्र उभे ठाकले!२

धर्म न वसतो उदरि कुणाच्या
नांदतसे तो हृदयी नराच्या
मनामनांच्या जुळता तारा, मंगलगीत स्फुरले!३

युगायुगांचे सुतक संपले
मनि स्नेहाचे दीप उजळले
सखे सोयरे जमले सगळे, दास न कोणी उरले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
काव्‍यमय सावरकर दर्शन

No comments:

Post a Comment