स्वातंत्र्य मिळालं. साऱ्यांना आनंद झाला. पण सावरकरांच्या भावना वेगळ्या होत्या.. त्यांच्या यातना, वेदना अगदी वेगळ्या होत्या.
ज्या स्वराज्यासाठी, ज्या स्वातंत्र्यासाठी आपण मृत्यूची पर्वा केली नाही - ते स्वातंत्र्य हेच का? स्वातंत्र्यलक्ष्मीच्या पूजनासाठी स्वतःची शिरकमलं अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं ते हेच का? स्वराज्य स्वप्नांच्या सुवर्णी शिखरासाठी ज्यांनी स्वतःला पायात गाडून घेतलं होतं त्यांचं स्वप्न हेच होतं का? नाही.. नाही.. अखंड भारत द्विखंड झाला नी त्यांचं स्वप्न भंगलं. म्हणून तर सावरकर उसळून म्हणाले
या स्वराज्यासाठी का रक्त आम्ही सांडले?
सर्वस्व अपुले वेचले! स्वप्न अमुचे भंगले!ध्रु.
मातृभू ही खंडिता
आज झाली वंचिता
बाल आम्ही सकल कसले, करित बसलो सोहळे?१
तत्त्वा न कोणी चिकटला
जो तो उताविळ जाहला
याचसाठी काय आम्हा ईश्वराने जगविले?२
हेच माझे देशबंधू
रागवूनी काय साधू?
शत्रू तर तडिपार गेला, काय कमि हे जाहले?३
जर्मनीचा कवि गटे
स्वप्नि वृत्ती रंगते
मी कवि, मग का न मानू? तोडले जे सांधते
स्वप्न नाही भंगले, आताच ते आरंभले!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment