Saturday, March 21, 2009

अंती मजला एक सांगणे.


१९६० मृत्युंजय दिनाचा समारंभ होता. त्या स्वातंत्र्यवीरांची वाणी ऐकायला पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो लोक जमले होते. सभेत ते म्हणाले –

मज सत्तेची तिळहि न इच्छा
ना शिवली चित्ता अभिलाषा!
परि निश्चये एक सांगतो - स्वतंत्र भारतभूचा पहिला राष्ट्रपती जर झालो असतो,
केल्या असत्या सीमा निश्चित!
पूर्वीच्या सरसीमा निजहृदि
पुनः पुन्हा आणुनिया सांप्रत
निर्जनभूची हिंदुभूमि मी, केली असती थोड्या अवधित!

माझ्या देशी प्रति युवकाला –
सैनिकि शिक्षण मिळले असते
विज्ञानाच्या महात्मतेने, ज्ञानविश्व हे विकसित होते!
द्या अवधी मज दोनच वर्षे
रशियाहुनही बलाढ्य माझा, देश आपणा करून दाखविन!  

कधीपासुनी विश्व असे हे
कधीच नाही बदलायाचे
जगता कळते सामर्थ्याची एकच भाषा
शस्त्रबळावर तोल सावरे विश्वशांतिची निर्मळ आशा!

मला जाणवे तुमचा प्रेमा !
हात जोडुनि परी विनवितो -
जीर्ण शरिरि या त्राण नसे हो -
मनोमनी मज भेटत जाहो!

अंती मजला एक सांगणे
शस्त्रबळा वाढवा - वाढवा
विज्ञानाच्या प्रयोगशाळा, प्रांतोप्राती असंख्य फुलवा
युद्धोत्सुक नवयुवका बनवा!
हिंदुराष्ट्र हे समर्थ घडवा, हिंदु राष्ट्र हे समर्थ घडवा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन

No comments:

Post a Comment